
Veermata Jijabai Bhosale (१२ जानेवारी १५९८ – १७ जून १६७४) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या, ज्यांना इतिहासात “राष्ट्रमाता” किंवा “जिजाऊ” म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील आणि म्हाळसाबाई आई होत्या. लखुजीराव जाधव यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाईंचा विवाह १६०५ साली शहाजीराजांशी दौलताबाद येथे झाला.
व्यक्तिमत्त्व आणि सद्गुण
जिजाबाई त्यांच्या शौर्य, संयम आणि दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध होत्या. त्या केवळ कर्तृत्ववान आईच नव्हत्या, तर तलवारबाजी, घोडेस्वारी अशा शारीरिक कौशल्यातही पारंगत होत्या. शिवरायांवर त्यांनी दिलेल्या संस्कारांची छाप त्यांच्या राजकारण आणि युद्धनीतीत दिसून येते.
हे हि वाचा – १२ जानेवारी Swami Vivekananda National Youth Day
Veermata Jijabai Bhosale यांचे इतिहासातील योगदान
जिजाबाईंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडजवळील देऊळगाव येथे झाला. लहान वयातच शहाजीराजांशी त्यांचा विवाह झाला. शिवरायांना स्वराज्याची संकल्पना समजावून देऊन त्यांनी एक महान योद्धा घडवला. शिवाजी महाराजांच्या शिक्षण, स्वराज्य निर्मिती आणि त्यांच्या निर्णायक क्षणांमध्ये जिजाबाईंचे मार्गदर्शन मोलाचे होते.
पुण्याचा पुनर्विकास
शिवरायांना पुण्याची जहागीर सुपूर्त झाल्यावर, जिजाबाईंनी पुण्याचा पुनर्विकास केला. शेतजमीन नांगरून शेतकऱ्यांना मदत केली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक परंपरा जपल्या. त्यांनी शिवरायांना वारकरी संतांचा उपदेश दिला आणि न्याय, समता, धर्मनिष्ठा शिकवली.
संकटांत धैर्यपूर्ण भूमिका
शिवरायांच्या आग्रा येथील सुटकेपासून ते स्वराज्याच्या विस्तारापर्यंत, जिजाबाईंच्या धैर्यपूर्ण भूमिकेचे अनेक दाखले इतिहासात आढळतात. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार सांभाळणे असो किंवा स्वराज्याच्या सीमेवरील संकटांवर मात करणे असो, जिजाबाईंनी आपल्या दूरदृष्टीने आणि निर्णयक्षमतेने कर्तव्य पार पाडले.
Rajmata Jijabai यांचे सांस्कृतिक व धार्मिक कार्य
जिजाबाईंनी केवळ राजकारणातच नव्हे, तर सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिले. पुण्यातील कसबा गणपती मंदिर, केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. तसेच त्यांनी हिंदू धर्मातील सहिष्णुतेचा प्रचार केला.
मृत्यू आणि वारसा
Rajmata Jijabai यांचे निधन १७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर झाले. त्या काळात शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक होऊन अवघे बारा दिवस झाले होते. त्यांचे जीवन हे मातृत्व, शौर्य, आणि दूरदृष्टी यांचे आदर्श उदाहरण आहे.
प्रेरणा आणि स्मारक
जिजाबाईंवर अनेक पुस्तकं, कविता, नाटके आणि चित्रपट साकारले गेले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी एक डाक तिकीट प्रकाशित केले.
निष्कर्ष
राजमाता जिजाबाई हे भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे जीवन हे प्रत्येक स्त्रीसाठी एक आदर्श आहे. त्यांनी आपल्या संस्कार, धैर्य आणि दूरदृष्टीने स्वराज्याचा पाया रचला, जो पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिक भक्कम केला. त्यांच्या कार्याचे स्मरण सदैव आदराने केले जाईल.
सदर माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आहे.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.