Emergency Movie : 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. हाच तो देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातील दिवस होता जेव्हा माणसाला त्याच्या जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले होते, हाच तो दिवस होता जेव्हा संविधानाने दिलेले मानवाचे मूलभूत अधिकार संपुष्टात आले होते,त्यावेळच्या तत्कालीन देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती.

लोकशाहीची हत्या
घटनेच्या कलम 14 ते 32 मधील सर्व नागरी स्वातंत्र्ये नष्ट करण्यात आली होती आणि हजारो विरोधी नेत्यांना बळजबरीने तुरुंगात टाकण्यात आले. मग अपील किंवा युक्तिवादाचा काहीही उपयोग झाला नाही. या दिवशी भारताचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना मध्यरात्री आणीबाणीच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले.आणि दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली.
हे हि वाचा – “पाताळ लोक २: नागालँडमधील गूढ खुनाचा थरारक प्रवास…
पंतप्रधानपदाचे सर्व अधिकार
पंतप्रधानपदाचे सर्व अधिकार संजय गांधी, देवकांत बरुआ, सिद्धार्थ शंकर रे आणि रजनी पटेल यांच्या हातात आले. बरुआ हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने दिल्लीत आणून ‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया’ अशा घोषणा देण्यात आल्या. रेडिओ आणि टेलिव्हिजन सरकारच्या ताब्यात आले.

आणीबाणी
याच घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या आधी कंगना रणौतने तिच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या फर्स्ट लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले होते . कंगना रणौत स्वतः भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. कंगना राणौत निर्मित आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा आणि कंगनाने चित्रपटाचा एक प्रोमो शेअर केला होता . यापूर्वी 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे .

कंगना काय म्हणाली ?
“संरक्षक की हुकूमशहा? आपल्या इतिहासातील सर्वात गडद टप्प्याचे साक्षीदार आहात जेव्हा आपल्या राष्ट्राच्या नेत्याने तेथील लोकांविरुद्ध युद्ध घोषित केले. यापूर्वी # 24 नोव्हेंबर रोजी जगभरात आणीबाणी जारी होत आहे,” असे कंगनाने जाहीर केले होते पण काही कारणास्तव चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
आणीबाणीबद्दल बोलताना, कंगना आधी म्हणाली होती, “आणीबाणी हा आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि काळा अध्याय आहे जो तरुण भारताला माहित असणे आवश्यक आहे.
ही एक निर्णायक कथा आहे आणि मी स्वर्गीय सतीश जी सारख्या माझ्या अति-प्रतिभावान अभिनेत्यांचे आभार मानू इच्छिते, अनुपम जी, श्रेयस, महिमा आणि मिलिंद हे एकत्र या सर्जनशील प्रवासाला सुरुवात करत आहेत. भारताच्या इतिहासातील हा विलक्षण भाग मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. जयहिंद!”
कंगना राणौत निर्मित आणि दिग्दर्शित, इमर्जन्सी मध्ये दिवंगत सतीश कौशिक, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
I am a professional film serial writer director and apart from this work I do blogging full time.I am the founder of 24 Yes Entertainment a production house.Besides this I have written and directed many OTT serials till date.