“महाराष्ट्राच्या शाळांमध्ये मोठे बदल! सरकारचे ऐतिहासिक पाऊल..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Jay Jay Maharashtra Majha Rajya Geet
Jay Jay Maharashtra Majha Rajya Geet

महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये राज्यगीत Jay Jay Maharashtra Majha Rajya Geet अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक पावलामुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्याभिमान निर्माण होईल. याशिवाय, शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या योजनेअंतर्गत आणखी कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Jay Jay Maharashtra Majha Rajya Geet अनिवार्य

राज्याचे अभिमानगीत Jay Jay Maharashtra Majha आता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे, ज्यामध्ये गैर-राज्य मंडळाच्या शाळांचा देखील समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या योजनेचा हा भाग असून, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेची सादरीकरण करण्यात आली.

हे हि वाचा – लाडकी बहिन योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांनी नावे मागे घ्यावी नाहीतर दंड भरावा…

शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितले की, अभिमानगीतासह मराठी भाषेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जाणार आहे. राज्यातील शाळा आणि अंगणवाड्यांचे भू-स्थानिक मापन करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल, असे राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नव्या शैक्षणिक आराखड्याचा (SCF) अंमल आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल.

शिक्षणव्यवस्थेतून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांनसाठी उपाय योजना

याशिवाय, शिक्षणव्यवस्थेतून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा राज्याचा मानस आहे. भुसे यांनी सांगितले की, वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी मजूर, व शेती कामगारांच्या मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी दीर्घकालीन उपाय केले जातील.

तसेच CSR निधीचा प्रभावी उपयोग करून शाळांसाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. मंत्री महोदयांनी मान्यवर आणि सेलिब्रिटींना त्यांच्या भागातील शाळा दत्तक घेण्याचे आवाहन केले आणि त्या शाळेच्या प्रगतीसाठी नियमित भेटी देण्यास प्रोत्साहित केले.

भुसे यांनी आगामी १०० दिवसांमध्ये राबवायच्या उपक्रमांचा आराखडा मांडला. राज्य पातळीवर CBSE पद्धती स्वीकारली जाईल, मात्र त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील. शाळांची गुणवत्ता आधारित क्रमवारी, प्रत्येक केंद्रामध्ये किमान एक दहावीपर्यंतची शाळा असणे, आणि किमान एक वर्ग स्मार्ट क्लासमध्ये रूपांतरित करणे, यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेला गती

क्लस्टर शाळांच्या संकल्पनेलाही या योजनेत स्थान देण्यात आले आहे, जरी यापूर्वी काही शिक्षणतज्ज्ञांनी या संकल्पनेला विरोध केला होता. शिक्षक भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी बालवर्ग शाळांची नोंदणी आणि त्यांचे किमान निकष निश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अफाट गुणांना अधोरेखित करत, त्यांनी सांगितले की, उत्कृष्ट शिक्षक हे मोठे भांडवल असून, इतरांसाठी आदर्श म्हणून त्यांचा उपयोग करावा. मुलींच्या शाळेत जाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सायकल वितरण योजना सुरू ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

Jay Jay Maharashtra Majha राज्यगीता च्या अंमलबजावणीसंदर्भात, गैर-राज्य मंडळाच्या शाळांचे मुख्याध्यापक म्हणाले की, ते अधिकृत आदेशाची वाट पाहत आहेत. “सध्या आमची प्रार्थना, शाळेचे गाणे आणि राष्ट्रगीताने आमच्या सभेची सुरुवात होते. राज्यगीत मराठी दिवसाच्या निमित्ताने म्हटले जाते, मात्र नियमित कार्यक्रमाचा भाग नाही,” असे एका मुख्याध्यापकांनी सांगितले.

Leave a comment

कोणता प्राणी आहे हा ज्याला तीन हृदय असतात ? जगातील सर्व मुंग्यांचे एकत्रित वजन केले तर ते किती होईल माहिती आहे… भारताचा पहिला नकाशा कोणी बनवला? हे तुम्हाला माहिती आहे का ? शमिता शेट्टी बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सध्या काय करतेय…? टॉलीवूडचा कॉमेडी किंग ब्रह्मानंदम यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे ?
कोणता प्राणी आहे हा ज्याला तीन हृदय असतात ? जगातील सर्व मुंग्यांचे एकत्रित वजन केले तर ते किती होईल माहिती आहे… भारताचा पहिला नकाशा कोणी बनवला? हे तुम्हाला माहिती आहे का ? शमिता शेट्टी बॉलिवूडची स्टाईल आयकॉन सध्या काय करतेय…? टॉलीवूडचा कॉमेडी किंग ब्रह्मानंदम यांचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे ?