शासन आपल्या दारी : शासकीय योजनांचा लाभ द्यायला थेट शासन आपल्या दारी..

"शासन आपल्या दारी योजना"

आज मी तुम्हाला ” शासन आपल्या दारी योजना 2023″ कार्यक्रमाच्या फायद्यांविषयी संपूर्ण माहिती पुरवणार आहे, ज्याचा उद्देश विविध योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यास स्वारस्य असल्यास आणि कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे आणि तपशील जाणून घ्यायचे असल्यास, हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. “शासन आपल्या दारी योजना” काय फायदे देते आणि त्यात काय समाविष्ट आहे ते पाहूया.


“शासन आपल्या दारी योजना” हा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ मिळवण्यात नागरिकांना येणारे अडथळे दूर करणे आहे. अनेकवेळा नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते, त्यामुळे गैरसोयीचे व विनाकारण मानसिक तणाव निर्माण होतो.

"शासन आपल्या दारी योजना"

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ शासन आपल्या दारी ‘ या राज्यव्यापी अभियानाचा भव्य कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या मुख्य उपस्थितीत तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

"शासन आपल्या दारी योजना"

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री महोदयांनी ‘ शासन आपल्या दारी ‘ या अभियानाचा मुख्य हेतू सांगितला. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अथवा इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागायचे.

"शासन आपल्या दारी योजना"

या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभही देण्यात येत आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांची पूर्तताही करून दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात सुमारे ५ हजार ४५७ कोटी रुपयांच्या निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.

शासन आपल्या दारी योजना

"शासन आपल्या दारी योजना"

अभियानाच्या माध्यमातून शासन सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येत आहे. नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी शासनातर्फे भरीव निधीची तरतूदही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.



केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.

"शासन आपल्या दारी योजना"

शासन आपल्या दारी योजने’च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात ‘शासन लागू दारी योजने’च्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, वन व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग, आदी उपस्थित होते.

"शासन आपल्या दारी योजना"

सर्व स्तरातील लोकांशी संपर्क साधण्याचा यामागचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी योजना’ राज्यात क्रांतिकारी बदल घडवून आणून देशासमोर आदर्श निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 13 मे रोजी राज्यात या मोहिमेची सुरुवात पाटणपासून झाली असून अवघ्या बारा दिवसांत लाखो लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेवर मुख्यमंत्री कार्यालयाचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे.

Read more: शासन आपल्या दारी : शासकीय योजनांचा लाभ द्यायला थेट शासन आपल्या दारी..

सूचना:शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सुक्ष्म नियोजन करा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

CM Kisan Samman Nidhi पहिला हप्ता या दिवशी मिळणार

Leave a comment

जगातील पहिली CNG मोटरसायकल लॉन्च किंमत ऐकून चकित व्हाल फक्त…. Hilarious Facts तुम्हाला कदाचित माहित नसतील. म्हणून काढला जातो या पक्ष्याचा टॅटू Good Habits For Kids : लहानपणापासूनच मुलांना लावा या सवयी माणसातला “देवमाणूस”
जगातील पहिली CNG मोटरसायकल लॉन्च किंमत ऐकून चकित व्हाल फक्त…. Hilarious Facts तुम्हाला कदाचित माहित नसतील. म्हणून काढला जातो या पक्ष्याचा टॅटू Good Habits For Kids : लहानपणापासूनच मुलांना लावा या सवयी माणसातला “देवमाणूस”